सोमेश्वर कारखान्याने सन २०२४/२०२५ गळीत हंगामातील खोडकी बिल १००/ – प्र. मे. टन व दुसरा हप्ता २००/ – प्र. मे. टन असे एकूण ३००/- प्रति मे टन तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर जमा करावे…!!! श्री सतिशभैया काकडे

0
InShot_20250519_145722178

सोमेश्वरनगर,प्रतिनिधी

सोमेश्वर कारखान्याने सन २०२४/२०२५ या गळीत हंगामात पहिली उचल २८००/- व उर्वरित एफ आर पी ३६३/ – रुपये असे एकूण ३१६३/- सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केलेले आहेत.परंतु आता कारखान्याचा गाळप हंगाम संपून दीड महिना झाला आहे त्यामुळे सोमेश्वर कारखान्याने सन २०२४/२०२५ गळीत हंगामातील खोडकी बिल १०० रुपये व दुसरा हप्ता २०० रुपये असे एकूण ३०० रुपये तत्काळ सभासदांच्या बँक खात्यावर जमा करावे.अशी मागणी शेतकरी कृती समितीचे वतीने सतिशभैय्या काकडे यांच्याकडून करण्यात आली आहे…!!!

दोन दिवसांपूर्वी माळेगांव कारखान्याने सन २०२४/२०२५ या गाळप हंगामाचे खोडकी बिल २०० रुपये जाहीर केले आहे. सोमेश्वर कारखान्यास उत्कृष्ट कार्यक्षमता व इतर कारणासाठी १० ते १२ पुरस्कार मिळालेले आहेत.मागील दोन ते तीन वर्षांमध्ये सोमेश्वर कारखान्याने ज्यादा ऊसाचे गाळप करून उच्चांकी क्रेशिंग,चांगला साखर उतारा, उच्चांकी साखर पोती, ज्यादा चे उपपदार्थ उत्पादन व बीज निर्मिती मध्ये अग्रेसर असल्याने कारखान्याने मागील काही वर्षापासून उच्चांकी अंतिम दर दिलेला आहे.त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने चेअरमन व संचालक मंडळाने सन २०२४/२०२५ चे खोडकी बिल १०० रुपये व दुसरा हप्ता २०० रुपये असे एकूण ३०० रुपये सभासदांच्या बँक खात्यावर जमा करावेत कारण सभासदांना शेतीच्या मशागतीचे कामे, ऊस लागण, खते तसेच पाल्यांची ॲडमिशन घेणे यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने कारखान्याने सभासदांचा विचार करून दिनांक ३१ मे पर्यंत खोडकी बिल व दुसरा हप्ता सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावा…!!!

तरी सोमेश्वर कारखान्याने मागील काही वर्षांपासून हंगाम संपल्यानंतर देण्यात येणाऱ्या खोडकी बिलाची परंपरा बंद केलेली आहे,त्यामुळे शेतकरी कृती समितीस सन २०२४/२०२५ खोडकी बिल व दुसरा हप्ता मागण्याची वेळ आलेली आहे हे दुर्दैवी बाब आहे व तसा पत्र व्यवहार देखील कारखान्याला केलेला आहे.तरी चेअरमन व संचालक मंडळाने याबाबत तत्काळ निर्णय घेऊन दिनांक ३१ मे पर्यंत सदर रक्कम सभासदांच्या खात्यात जमा करण्यात यावी अन्यथा शेतकरी कृती समितीस मोर्चा काढावा लागेल याची नोंद घ्यावी.यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास व कारखान्यास आर्थिक तोशीस लागल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन,संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांची राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन शेतकरी कृती समितीच्या वतीने कारखाना प्रशासनास देण्यात आलेले आहे…!!!

( ऊसाचे गाळप झाल्यापासून १४ दिवसांमध्ये FRP रक्कम देणे कायद्याने बंधनकारक असतानाही,कारखान्याने मागील चार गाळप हंगामाची FRO रक्कम विलंबाने दिल्याने त्यावर मिळणाऱ्या व्याजाची मागणी थोड्याच दिवसांत शेतकरी कृती समिती करणार आहे. कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ हे मागितल्याशिवाय द्यायचे नाही असे धोरण अवलंबले आहे का ? एक तर FRP एकरकमी नाही, FRP रकमेचे तुकडे करायचे, सभासदांचे कोणतेही हित पाहायचे नाही.त्यामुळे सन २०२१/२०२२ ते २०२४/२०२५ या चार गळीत हंगामात FRP उशिरा दिल्याने त्याचे जवळपास अंदाजे पाच ते सहा कोटी रुपयांच्या वर होणारी व्याजाची रक्कम ही सभासदांच्या न्याय हक्काची मिळालीच पाहिजे कारण सभासदांनी या रक्कमेवर सोसायट्या व बँकेची व्याज भरलेली आहेत.तसेच चालू वर्षी कोर्टाने देखील FRP एकरकमी देण्याबाबतचा महत्वाचा निकाल दिलेला आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed